दौंड प्रतिनिधी
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन :- राज्यातील लोककलावंत यांची परिस्थिती अंत्यत हलाखीची झाली असून त्यांना जीवन जगणे अवघड होऊन बसले आहे. लोककला केंद्र सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी केली आहे.
राज्य शासनाने मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लॉकडाऊन लागू केले, यामुळे सर्वच तमाशा खेळ, कलाकेंद्र बंद पडली, बंद पडल्याने कलावंतांचे रोजगार बुडून आर्थिक स्रोत बंद झाल्याने कलावंतांना प्रपंच चालवणे अवघड होऊन बसले आहे.
आज आठ महिने होऊन गेले आहेत दरम्यान राज्यातील अनेक कलाकारांनी खा . सुप्रिया सुळे, मा . शरद पवार साहेब, सांस्कृतिक मंत्री, लोकप्रतिनिधी यांना समक्ष भेटून लेखी निवेदने देऊनही अद्याप कला केंद्र व तमाशा थिएटर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. साधारण फेब्रुवारी ते जून हे गाव – गावच्या यात्रा जत्रांचे दिवस, म्हणजेच कलावंतांना चार पैसे मिळण्याचा हंगाम, या हंगामाच्या उत्पन्नावर पुढील वर्षभर प्रपंचाची गुजराण करावी लागते, संपूर्ण हंगाम फेल गेला. कलाकारांनी जगावे कसे ? कलाकार पोटासाठी हताश झाले आहेत. लोककला ही राज्याची संस्कृती आहे. ही संस्कृती लोककलावंतांनी जिवंत ठेवल्याने जगली आहे, आत्ता मात्र लोककलावंतांचेच जगणे अवघड ठरू लागले आहे.
“आत्ता शासनाने लोककलावंतांचा फार अंत न पाहता सर्व ते नियमांचे आणि सोशल डिस्टनचे पालन करून कला केंद्र सुरू करण्यास त्वरित परवानगी द्यावी,अशी मागणी डॉ,अशोक जाधव आणि न्यू अंबिका कला केंद्राच्या प्रमुख जयश्री जाधव यांनी केली आहे “
One Comment
Yuriko Francione
Spot on with this write-up, I really believe this site needs much more attention. I’ll probably be back again to read through more, thanks for the info!