अक्षय आखाडे (विशेष प्रतिनिधी )
नवराष्ट्र न्युज ऑनलाईन :- सर्व सिने विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या २०१९ साठीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज नुकतीच करण्यात आली आहे. ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गेल्या वर्षी ३ मे रोजी होणार होती.मात्र आज केवळ २०१९ मध्ये तयार झालेल्या चित्रपटांसाठीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.दिल्लीत राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनीही आपली छाप सोडली आहे. ‘बार्डी’ ह्या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपट म्हणून गौरव्यात आले .बार्डी’ या चित्रपटासाठी सवानी रवींद्र यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला आहे.तर सर्वोत्तम मराठी फीचर फिल्म म्हणून ‘ ‘पिकासो ‘ या चित्रपटाला बहुमान मिळाला आहे.सामाजिक विषयावरील सर्वोत्तम चित्रपट म्हणून ‘ आनंदी गोपाळ ‘ या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे .याचं राष्ट्रीय एकात्मता साठी ‘ ताजमहाल’ या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरणाऱ्या” खिसा”या लघुपटाचे आपली छाप पाडली असून, प्रसिद्ध नाट्य आणि सिनेअभिनेते” कैलास वाघमारे” लिहिलेल्या ‘खिसा’ या लघुपट साठी दिग्दर्शक ” राज प्रीतम मोरे ” पदार्पणातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय लघूपटाचा पुरस्कार जाहिर झालाय.
खिसा ही एक लहान मुलाची गोष्ट आहे. शाळेच्या गणवेशाला इतरांच्या खिशापेक्षा मोठा खिसा असणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. पारंपारिक नितीमूल्यांच्या खिशात राहणाऱ्या माणसांत राहताना या मुलाला कसा त्या खिशाचा बळी द्यावा लागतो याची ही गोष्ट आहे.
खिसा या लघुपटाच्या निमित्ताने राज प्रीतम मोरे सारखा सवेदांशिल दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीत यायच्या प्रयत्नात आहे. या लघुपटात कैलास वाघमारे, श्रुती मधुदिप, शेषपाल रणवीर, वेदांत श्रीसागर यांच्या भूमिका आहेत.मुळात खिसा ही एक लहान मुलाची गोष्ट आहे. शाळेच्या गणवेशाला इतरांच्या खिशापेक्षा मोठा खिसा असणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. पारंपारिक नितीमूल्यांच्या खिशात राहणाऱ्या माणसांत राहताना या मुलाला कसा त्या खिशाचा बळी द्यावा लागतो याची ती गोष्ट आहे.
” राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ‘खिसा’चे लेखक कैलाश वाघमारे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आनंद व्यक्त केला ,” आपण लिहलेल्या कलाकृतीला जेव्हा असा पुरस्कार मिळतो तेव्हा निश्चितच आनंद होतो.सगळ कसं एक अंगी चालले आहे अस वाटत असतानाच अशी घोषणा होते.तेव्हा सकारात्मकता असल्याचे जाणवते. पुरस्काराची घोषणा ऐकुन खूप छान वाटल .एक लेखक म्हणून माझे म्हणणे लोकांपर्यंत पोहचले आहे अस कैलाश यांनी यावेळी सांगितले.”
2 Comments
zXKyZocn
aHijYlwYvN